शिवरायांची जयंती वाटेल तेव्हा पाहिजे!

१९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि ८ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती आल्यामुळे महाराष्ट्रातील मावळ्यांना मोठाच उत्साह आला होता. त्यामुळे प्रत्येक शहराच्या रस्त्यारस्त्यांवर तीन तीन जण बसून उलट्या बाजूने रस्त्यावरून दुचाकी नेणे काय, हातात शीतपेये वा बियरच्या बाटल्या आणि दुसऱ्या हातात तलवारी नाचविणे काय किंवा रस्त्याने मोठमोठ्याने ओरडत जाणे काय, अशा शौर्य दाखविणाऱ्या बाबींना उधाण आले होते.
टरा टरा आवाज करत जाणाऱ्या दुचाकी म्हणजे हिंदवी स्वराज्याचा जयघोषच होता जणू. ज्याचा आवाज जास्त त्याची शिवाजी भक्ती मोठी. शिवाय एखादी मुलगी किंवा मुलींचा घोळका जवळून जाऊ लागला, की या इतिहासप्रेमाला आणखी उधाण येणारच. त्यामुळे त्यावेळी दुचाकीच्या आवाजासह हॉर्नचा आवाजही वाढलाच पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव लोकांना कशी होईल.
शिवाय महाराजांनी कायद्यांचे पालन करावे, सौजन्याने वागावे अशी शिकवण दिलीही असेल कदाचित. पण ती पाळण्याची आता गरजच काय. हवे तेवढे प्रदूषण करा, हवे तेवढे आवाज काढासरकार आपलेच आहे. बजाते रहो! आणखी तुमचे शिवाजी अन् गणेशोत्सव मग आमचे बाबासाहेब, तुमचे बाबासाहेब तर आमचे परशुराम ही स्पर्धा आहेच. त्यांनाही बिचाऱ्यांना आपल्या भावनांचा निचरा करण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी शिमग्यासारखीच साजरी झाली पाहिजे, दिवाळीसारखी नव्हे! तरी बरे गणपती बाप्पांच्या जन्मतारखेचा काही वाद नाही.
तेव्हा महाराजांच्या नावाने हा जो गलका चालला होता, त्यामुळे त्यांना भरून आले असेल. ही भक्ती अशीच दाखवायची असेल, तर शिवरायांची जयंती केवळ दोनदा साजरी करून चालणार नाही. इंग्रजी तारीख आणि मराठी तिथी यासोबतच वारानुसारही जयंती साजरी करावी. शिवाय ग्रेगरीयन आणि रोमन कॅलेंडर वेगवेगळे असल्यामुळे त्यांनुसारही वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी करावी. म्हणजे डॉल्बी सिस्टम आणि भर रस्त्यात घातलेले मंडप यांच्या मदतीने आपण आपल्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ शका. वर्षातून अनेकदा, वाटेल तेव्हा!

हे तण काढून टाकाच!

पंतप्रधाननरेंद्रमोदीआणित्यांचेमंत्रिमंडळदरदिवसाआडएकवादनिर्माणकरूनचर्चेलाखाद्यदेतअसतानाकाँग्रेसजनांचाआत्मशोधचालूआहे. काँग्रेसजनसंकटातसापडलाम्हणजेनेहरुवंशीयांच्याउंबरठ्यावरडोकेटेकण्याचीत्यांचीवहिवाटआहे. योगायोगानेजवाहरलालनेहरूयांची१२५वीजयंतीयंदाचआलीअसल्यानेकाँग्रेसजनांनाअतिरिक्तबळचमिळाले. त्यातचकुमारकेतकरयांच्यासारखेबिनशुल्कविचारवंतकाँग्रेसच्यापदरीअसल्यामुळेआपल्याअगतिकतेलावैचारिकतेचामुलामादेण्याचेप्रयत्नजोरातसुरूझालेआहेत.

याचाचएकभागम्हणूनकीकाय, पुण्यातसोमवारी(डिसेंबर) एककार्यक्रमझाला. आपल्याभात्यातीलघासूनघासूनबोथटझालेलेअनेकबाणकेतकरांनीयाकार्यक्रमातकाढला. एकाकेतकरांनीमहाराष्ट्रालाज्ञानकोशदिलाआणिदुसरेकेतकरगुणगानकोशदेण्यासनिघालेआहेत. दिशाआणिकार्यक्रमहरविलेल्याकाँग्रेसजनानानिरस्तपादेशेएरण्डोsपिद्रुमायतेयान्यायानेकेतकरजेकाहीबरळतहोतेतेफारअभ्यासपूर्णहोते, असाभासहोतअसावाकदाचित. आताकदाचितअसे, कीअनेकलोकांनाहेभाषणअत्यंतकंटाळवाणेवाटतहोतेआणिमाजीमुख्यमंत्रीपृथ्वीराजचव्हाणहेतरचक्कडुलक्याकाढतहोते.

काँग्रेसकार्यकर्त्यांचीधमालअशी, कीयाहीकार्यकमातकाहीलोकआलेआणिआम्हीकाँग्रेसचेचकार्यकर्तेआहोत, आजअंतुलेंचेनिधनझालेअसल्यामुळेहाकार्यक्रमरद्दकरा,” अशीमागणीकरतत्यांनीगोंधळहीघातला. हेकार्यकर्तेअगदीबॅनरसकटजय्यततयारीनेआलेहोते. त्यांनाघालवताघालवताआयोजकांचीपुरेवाटझाली.

याकार्यक्रमातकेतकरांनीफेकलेल्याकाहीमौलिकवाक्यांचेतुकडेपाहाः(कंसातीलवाक्येआम्हीपत्रकारांच्याचर्चेचे).

  • पत्रकार म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे, की टीव्ही, वृत्तपत्रांतील बातम्या पाहू नका. विद्वान म्हणून आम्ही जे वृत्तवाहिन्यांवर चर्चा करतो किंवा लिहितो त्यात काहीही अर्थ नाही. जे घडलंय ते दाखविण्याची किंवा छापण्याची खात्री नाही आणि जे छापलंय त्यात किती दडवलंय हे कळण्याची सोय नाही.
  • मोदी किंवा त्यांच्या समर्थकांनी सर्व मीडिया विकत घेतला आहे. त्यामुळे मोदी भाजपच्या विरोधात काहीही समोर येऊ देत नाहीत. (असं होऊ शकतं? मग नॅशनल हेरॉल्ड नावाचा नेहरूंनी सुरू केलेला पेपर काँग्रेसवाल्यांनी मोडून का खाल्ला? खुद्द महाराष्ट्रात लोकमत, एकमत, लोकपत्र . वृत्तपत्रे काँग्रेसच्याच मालकीची आहेत. त्यांचे हात कोणी बांधले आहेत का?)
  • आज अमेरिकेत जे काम करत आहेत आणि मोदींना पाठिंबा देत आहेत, ते सगळे नेहरूंच्या कृपेने. कारण नेहरूंनी आयआयटी आयआयएम काढल्या त्यामुळेच देशात मध्यमवर्ग तयार झाला. त्यापूर्वी मध्यमवर्ग नव्हता. (देशात नवब्राह्मणांचा एक वर्ग तयार करण्यात आयआयटींचा हातभार लागला आहे. शिवाय या संस्थांनी देशाच्या प्रगतीत काय हातभार लावला, हेही गौडबंगाल आहे. आणखी म्हणजे नुसत्या संस्था काढून काम भागत नसते, त्यात शिकणाऱ्या व्यक्तींच्या रोजगाराची सोय कोणी करायची. देशाला बंदिस्त अर्थव्यवस्था देऊन आणि परमिट राजच्या रूपाने लोकांना रोजगारापासून दूर ठेवून परदेशात जाणे भाग पाडायचे. वर आपणच त्यांच्या नावाने बोंब मारायची.)
  • स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाची एकही व्यक्ती सामील झाली नाही. (हे तर तद्दन खोटे विधान होते. कारण बाकी कोणी असो का नसो, खुद्द केशव बळीराम हेडगेवार यांनी १९३० च्या सत्याग्रहात भाग घेतला होता, हे साधे वास्तव आहे.)
  • भाक्रानांगल धरण काय तुझ्या काकाने बांधले का? (होय, हेच शब्द होते).
  • सांस्कृतिकतेचा बुरखा पांघरलेली रा. स्व. संघ ही फॅसिस्ट संघटना आहे. (रा. स्व. संघाबाबत मी सांगू शकत नाही, मात्र केतकर हा पत्रकारितेचा बुरखा पांघरलेला भाट आहे, याबद्दल खात्री आहे.)


सुदैवानेकाँग्रेसनेत्यांनानेहरूंबद्दलतेवढीआस्थानाही. काँग्रेसजनांच्यादृष्टीनेगांधीघराण्यातीलजीव्यक्तीगादीवरअसतेतिच्याअवतीभोवतीब्रह्मांडफिरतअसते. त्यामुळेत्यांच्यादृष्टीनेसोनिया, राहुलआणिप्रियंकायातिघांशिवायबाकीसगळेतोंडीलावण्यापुरतेआहे.

परंतु, नेहरूवादनावाचाएकपंथजोरातचालूअसतोआणियापंथाकडूनअशातऱ्हेचीअनेकखोटीवाक्येप्रसृतकरण्यातयेतअसतात.

संयुक्तमहाराष्ट्रआंदोलनाच्याकाळातआचार्यअत्रेयांनीडॉ. बाबासाहेबआंबेडकरयांचीभेटघेतलीहोती. त्यावेळी, म्हणजे१९५६५७च्याकाळात, बाबासाहेबांनीत्यांच्याकडेबोलूनदाखवलेहोते, कीसरकारीखर्चानेहामाणूस(पं. नेहरू) मुलीला(इंदिरागांधी) परदेशदौऱ्यावरघेऊनजातोआणिकोणीकाहीहीबोलतनाही. हेलोकशाहीलामारकआहे.’ याचाअर्थनेहरूंनीइंदिरागांधींनाकाँग्रेसवरलादण्याचेप्रयोग१९५६५७पासूनचसुरूकेलेहोते.

नेहरूबिल्कुललोकशाहीवादीनव्हते. त्यांनाटीकाथोडीहीआवडतनसे. याचेउत्तमउदाहरणम्हणजेस्वतःच्याजावयासोबतत्यांनीकेलेलीवर्तणूक. फिरोजगांधीयांनीआपल्यासासऱ्यावरसंसदेतबाहेरहीकठोरटीकाकरणेकधीसोडलेनाही. याचेफळम्हणूनइंदिरागांधीत्यांनासोडूननेहरूंकडेराहायल्यागेल्या. शेवटीत्यांचादुर्दैवीमृत्यूझाला.

नेहरूलोकशाहीवादीहोते, धर्मनिरपेक्षहोते, अमुकहोते, तमुकहोते, अशाअनेकबाबीफिरतअसतात. पूर्वीशिक्षणाचाप्रसारनव्हताआणिदेखल्यादेवादंडवतहाप्रकारहोता, तेव्हाहेथोतांडचालतअसे. आताचीपिढीबापदाखवनाहीतरश्राद्धकर, अशापद्धतीचीआहे. मगआपलेखोटेनाणेचालेनासेझाले, कीदेशातफॅसिझमवाढतआहे, लोकशाहीसंकटातआहे, असेहाकारेघातलेजातात.

मोदींनादेशकाँग्रेसमुक्तकरायचाआहे. तेकामबाजूलाठेवलेतरीचालेल. काँग्रेसहाकाहीएवढावाईटपक्षनाही. त्यापेक्षादेशालानेहरूवाद्यांपासूनमुक्तकरण्याचीगरजआहे. तेवढेकामत्यांनीकरावेआणिस्वच्छभारतअभियानातहेहीतणकाढूनकाढावे!

यांना कोणीतरी सन्मान द्या हो!

Shiv Sena begging for respect

शिवसेनेला सध्या सन्मानाची प्रचंड आवश्यकता आहे. राज्याचा सन्मान अनुशेष भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्राणपणाने प्रयत्न चालवले आहेत. याबाबतीत त्यांची, अशाच सन्मान आणि स्वाभिमानाच्या नावाने वेगळी चूल मांडणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसशी जोरदार स्पर्धी आहे.

अटीतटीचे राजकारण!

चर्चा, मग ती जागा वाटपाची असो किंवा मंत्रिमंडळात जागा मिळण्याची, ती सुरू असली की मला माझेच हे जुने व्यंगचित्र हमखास आठवते. आता सरकारमध्ये सामील होण्यासाठी भाजपशी बोलणी करण्याआधी आणखी एक अट टाकून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेच एक पाऊल टाकले आहे. त्याआधी भाजपनेही आधी विश्वास प्रस्ताव व मगच मंत्रिमंडळात समावेश, अशी अट टाकून याचप्रकारचे राजकारण केले आहे.
शिवसेना आणि भाजपला जे काही सिद्ध करायचे असेल ते करोत. मग तो विश्वासदर्शक ठराव असो किंवा स्वबळावर जिंकण्याची क्षमता असो. पण त्यासाठी जनतेला वेठीस धरून ही मंडळी काय साध्य करत आहेत?
विधानसभा निवडणुकीपूर्वी या लोकांनी असेच अटी-प्रतिअटींची हुतूतू खेळले आणि दोघांचाही दम निघेल एवढी चिखलफेक केली. ती कमी म्हणून की काय, आता सरकारमध्ये जायचे अथवा नाही, यावर अटीतटीचे राजकारण चालू आहे.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाल्यावरही सरकार स्थापनेसाठी 12 ते 17 दिवस लागले होते. कारण तीही मंडळी एकमेकांना अशा स्वतःच्या बेटकुळ्या दाखविण्यात गर्क होती. आज त्यांचे हाल सर्वांच्या समोर आहेत. यांचेही असे न होवो, म्हणजे मिळवली!

नवे मुख्यमंत्री बेबंदशाही थांबवणार का?

1.9 महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची सर्व जण फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असले, तरी राज्याची गाडी रुळावर ठेवण्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बेबंदशाही या एका शब्दात वर्णन करता येईल, अशी परिस्थिती मागील सरकारने त्यांच्यापुढे ठेवली आहे. कायदा सुव्यवस्था असो का आर्थिक व्यवस्था, सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे.

फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच दिवशी पुण्यात सहा मजली इमारत कोसळली. त्यात एक व्यक्ती दगावली. त्यापूर्वी आठ दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. आधीच्या सरकारने घालून ठेवलेल्या घोळाची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार, असे नवे मुख्यमंत्री ठासून सांगत आहेत आणि त्यांच्या आजवरच्या निष्कलंक चारित्र्याकडे पाहता ते खरे होईलही. परंतु राज्याच्या कारभारात जरब कशी बसवणार, हा प्रश्न त्यांना आधी सोडवावा लागेल.

कमळाच्या चिन्हावर घड्याळ्याची अनेक माणसे निवडून आली आहेत. शिवाय वर बिनशर्त पाठिंब्याचा टाईम बॉम्ब आहेच. त्यामुळे सरकारचा चेहरा बदलला तरी स्वभाव तोच राहीला, असे व्हायला नको. याचीही काळजी फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.

या उप्पर स्वपक्षातील नाठाळांना वठणीवर लावण्यातही तरुण मुख्यमंत्र्यांची ऊर्जा खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षी भाजप राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात झाली होती. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी केलेली हडेलहप्पी आणि पत्रकारांना गृहित धरण्याची त्यांची वृत्ती, यामुळे अनेक पत्रकारांनी फडणवीस यांच्या उपस्थितीतच वाभाडे काढले होते. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यावेळी प्रत्यक्ष माफी मागितली होती.

त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बेमुर्वतपणाबद्दल मी फडणवीस यांना इमेलही केला होता आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल माफी मागणारा इमेलही केला होता. त्यातून त्यांचा प्रांजळपणा दिसला असला तरी ठिकठिकाणच्या अशा स्थानिक नेत्यांना ते कसे आवरणार, हा प्रश्नच आहे. कारण पुण्यातील भाजप नेत्यांच्या वर्तनात त्यानंतरही काही परिणाम पडलेला दिसला नाही. इतका की, ऐन निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तेव्हा अशा सर्वच आघाड्यांवरील बेबंदशाही रोखण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. हे काम त्यांनी पार पाडावे, हीच मनापासून इच्छा आणि त्यांना शुभेच्छा!